Jul 8, 2022

रिमझिम गिरे सावन....

रिमझिम गीरे सावन ...

दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि  नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!

Jul 6, 2022

संपन्न वारसा

हरप्पन संस्कृती मधील मोएनजो दरो आणि हरप्पा ही दोन गावे तर पाकिस्तानात गेली. ती बघायची खूप इच्छा असूनही ते शक्य नाही. पण याच संस्कृतीतील लोथल हे गाव अहमदाबाद जवळ असल्याने ते बघायचे कधीपासून मनात होते. ते आज पाहिले... 
साडेतीन हजार वर्षापूर्वी मातीत गडप झालेली ही गावे... त्यांचे बाथरूम, चुली, गोडाऊन, डॉकयार्ड, कारखाने... सगळ्यांच्या विटांच्या रांगा फक्त शिल्लक आहेत. गाईड म्हणाला की या भिंती दहा बारा फूट खोल होत्या. नंतर त्या मातीने भरून घेतल्या परत. तो proper गाईड नव्हता. तिथे काम करणारा माणूस होता. पण तो म्हणाला की आधीच्या पूर्ण भिंतींचे फोटो काढून म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तो कितपत खर खोटं सांगत होता माहीत नाही. लोथल हे मुएंजो दरो आणि धोळा विरा प्रमाणे अजून युनेस्कोने जपायला घेतलेले नाही. त्यामुळे तिथे अनास्था दिसते. 
 म्युझियम दुरुस्ती साठी बंद असल्याने बघता आले नाही.
त्यात तिथे सापडलेल्या टेराकोटा, शंख शिंपले आदिपासून बनवलेल्या मण्यांच्या माळा, भांडी, खेळणी वगैरे ठेवलेली आहेत.
याशिवाय तांबे आणि ब्राँझच्या वस्तू... टेरकोटाच्या भांड्यांवर पेंटिंग आहे.
काल पाच - सात मजली विहिरी पाहिल्या. परवा मोढेराचे सूर्यमंदिर पाहिले. भारतात अशा प्राचीन वास्तू, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. 
प्रत्येक शिल्प कथेत सगळीकडे स्त्रिया, पुरुष, मुले सोबत बरोबरीने वावरताना दिसतात. कुठेही स्त्रिया घुंघट मध्ये दिसत नाहीत. 
शिल्पातील एकेका स्त्रीच्या अंगावरील आभूषणे, त्यांच्या केशभूषा बघता थक्क व्हायला होते. व्यवस्थित शेप दिलेल्या दाढीवाल्या पुरुषांची शिल्पे, स्त्रियांच्या हातात पर्स, आरसा, पुस्तक, लेखणी इत्यादी वस्तू.. कोरलेली वाक्ये, लिपी, भाषा ...हे सर्व पाहता भारतात दीड दोन काय, त्याहून कितीतरी अधिक वर्षे आधीपासून संपन्न, आधुनिक अशी नगरे होती, कारखाने होते, निर्मिती होती. ज्ञान होते. याचे ढळढळीत सूर्यप्रकाशा इतके लख्ख पुरावे ठायी ठायी आढळतात.
तरीही जेव्हा भारतात मोगल आणि इंग्रज येई पर्यंत काहीच, अगदी सुई देखील बनत नव्हती असे म्हणणारे, आणि बनत होते असे म्हणणाऱ्या लोकांना मंद, अंध भक्त इत्यादी म्हणणारे अतीशहाणे लोक किती खोटारडेपणा करतात ते कळतं...
अनेक प्राचीन मंदिरे भूगोल आणि खगोलशास्त्राच्या परफेक्ट ज्ञानावर अशा रीतीने स्थापित आहेत की सूर्यकिरणे ठराविक वेळी बरोबर गाभाऱ्यातील मूर्तीच्या पायावर येतात.
Harappan कालीन नगरात शास्त्रशुद्ध भुयारी गटार व्यवस्था होती. होड्या होत्या, जहाजे होती, व्यापार होता, कला होत्या, क्रीडा होत्या....
आपण अशा एका संपन्न वारशाचे वंशज आहोत. याचा आनंद वाटतो.

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...