Showing posts with label फेसबुक पोस्ट. Show all posts
Showing posts with label फेसबुक पोस्ट. Show all posts

Oct 23, 2025

.. बीते हुए दिन..!

 भाऊ तालुक्याच्या गावी शिकायला होता. आठवीपासून पुढे. दिवाळीच्या सुट्टीत तो येताना तिथून रांगोळी, रंग, ठिपक्यांचा कागद घेऊन यायचा. रांगोळीचे पुस्तक सुद्धा..

त्या आधी आम्हाला, म्हणजे निदान मला तरी रांगोळी प्रकार माहिती नव्हता.

त्या खेड्यावर, जिथे मुस्लिम अधिक आणि मोजके हिंदू गरीब राहत होते, तिथे रांगोळ्या दृष्टीस पडत नव्हत्या.

हिंदूं बहुजनांच्या शेणाने सारवलेल्या ओटीवर क्वचित तांदूळ पिठाने की चुन्याने कोण जाणे, चित्र रेखाटलेली असत. पण त्याला रांगोळी नाही, तर 'कणा' म्हटले जात असे.

भाऊ रांगोळी काढायचा, आकाश कंदील बनवायचा, फटाके फोडायचा. तो शहरात राहिल्याने आणि मुळातच स्मार्ट होता. मी बुजरी, आत्मविश्वास हरवलेली, तर तो आत्मविश्वासाने भरलेला, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा होता. त्याची लोकांवर छाप पडे. त्या खेड्यात सातवीत असताना त्याने नाटक बसवले होते.

माझ्याकडे कुणी ढुंकून बघत नसे. वयाच्या जवळपास सात आठ वर्षापर्यंत कुणी बोलायला आले तर अंगठ्याचे नख दातात चावत खाली मान घालून गप्प बसणे एवढेच मी करी.

भाऊ सातवीत होता, तेव्हा मी पहिलीत. वर्गात शिकवलेले सारे येई. पण बोलत नसे. अंगठा दातात आणि मान खाली. 🤗

तेव्हा पहिली दुसरीला लेखी परीक्षा नसत. फक्त तोंडी. वार्षिक परीक्षा आली तरी मी वर्गात एकदाही तोंड उचकटले नव्हते. सगळं येत असून गुरुजींसमोर अवाक्षर काढायला तयार नाही पठ्ठी.

गुरुजी म्हणाले सगळ्या मुलांना बाहेर काढतो. मग बोलशील?

मान खालीच..

गावातच मावस बहीण होती. ती होती सतरा अठरा वर्षांची. नुकतीच तालुक्याला राहून मॅट्रिक झालेली. मी तिचं शेपूट होते. दिवसभर तिच्या मागे मागे. गुरुजी म्हणाले, ती घेऊ दे का परीक्षा? तिच्यासमोर बोलशील का?? 

तिला बोलवले. तिने प्रश्न विचारले. 

पण.. उंहू..!

भाऊ घेऊ दे का परीक्षा..

छे...

खाली मान आणि अंगठ्याचे नख दातात..

बोलेन पण समोर गुरुजी नको...🤗

But ऐसा कैसे चलेंगा बेबी...

फिर तो बेबीको नापास करनाही पडेंगा ना...

कुछ तो बोल बेबी... एक लाईन ही पढ दे मेहरबानी कर के..

गावच्या खोतांची बेबी म्हणून बेबीला एवढी सवलत देऊ करून पण बेबी एक अक्षर वाचायला तयार नाही.

घरी मात्र पोपट लाजेल... एवढी बडबड, वादावादी, भावाशी भांडण... 🤦 सर्व कविता पाठ 🤗

बेबी पहिलीतच नापास..

या बेबीने नंतर पुढे जाऊन एम ए च्या मुलांच्या व्हायवा घेतल्या 🤦

गोष्ट रांगोळीपासून सुरू होऊन कुठे पोचली 🤦..

जाऊ दे.. दिवाळीची गोष्ट पुन्हा केव्हा तरी... 🤗


- अलका गांधी - असेरकर 



Apr 6, 2025

ऊन्हं

सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं आपला दरवाजा उघडा पाहून हळूच डोकावत राहावं. आपल्या टुकु टुकु डोळ्यांनी न बोलता बघत राहावं..तसं..आणि दुसरं तान्हं बाळ पाहून आपल्या घरातील बाळही ज्याप्रमाणे उड्या मारून खिदळू लागतं; तसंच त्याला पाहून एकलदुकल कुंडीतला कोवळा वसंतही उल्हसित होऊन नाचू लागतो.

मी त्याला आपल्या हातात धरू बघते. त्याच्याशी काही क्षण खेळू पाहते. पण सकाळच्या कामाच्या धबडग्यात एवढा वेळ कुठं असतो त्याच्यात गुंतून राह्यला. मग मी त्याच्याकडे बघितल्या न बघितल्यासारखे करून आपल्या कामाला लागते. 

ते हिरमुसून परत फिरतं. मीही त्याला विसरून जाते. 

हे बाळऊन आता मोठं होत जाईल. पूर्व-पश्चिम योग्य दिशेत नसलेल्या माझ्या तिरपागड्या घरातही वाट वाकडी करून शिरू लागेल. कारण त्याला मी आवडते.. हुं ?..की मला ते आवडतं,  म्हणून असेल कदाचित. ऊन्हावर प्रेम करणारी माणसं वेडीच असतात नाहीतरी...
रंगपंचमीचे वेध त्याला आत्ताच लागू लागलेत. स्वच्छ निळ्या तलम आभाळावर प्रहरांचे रंग उधळू लागलंय. वा-यांच्या लहरींसोबत धुळवड खेळू लागलंय. पळस-पांगारा-काटेसावर त्याच्या स्वागताच्या तयारीत लागलेत. गुलमोहर, बहावा वाट पाहू लागलेत. त्याला पाहून ते अधिक रंगात येतील आणि त्यांना पाहून तेही अजून चमकू लागेल. 
चैत्रात त्याचं बारसं होईल. लोक त्याला उन्हाळा उन्हाळा म्हणू लागतील. कडूनिंबाच्या सावलीत डाळपन्हं खाऊ घालतील. कोकीळ गाऊ लागतील. आम्रमंजि-या डोलू लागतील.

जरा मोठं झालेलं हे व्रात्य ऊन माझ्या घरात सगळीकडे नाचू लागेल. दुपारचं जरा झोपू देणार नाही. मग त्याने घरात येऊ नये म्हणून मी हलकेच पडदे सरकावून घेईन, दारं खिडक्या लोटून घेईन. माझं मन थोडं खाईल, त्याला हे असं हुडूस हाडूस केल्यामुळे. पण आता ते इतकं मोठं झालंय की त्याला त्याचं काही वाटत नाही. कारण त्याला मज्जाव करून हवाहवासा अंधार बेडरूममध्ये करून मी दुपारची सुस्तावून ताणून देते आणि जेव्हा चारच्या ठोक्याला उठून सैपाकघरात चहाचं आधण ठेवायला जाते, तेव्हा ते सैपाकाच्या ओट्यावर पसरलेलं दिसतं. ओट्यावर घासूनपुसून, चमकावून पालथ्या घातलेल्या स्टीलच्या भांड्यांशी ऑंखमिचौली खेळत असतं. मी पुन्हा हरखून जाते. त्यालाही घोटभर चहा पाजते. आता माझ्यापाशी थोडा निवांत वेळ असतो. मी त्याच्याकडे एकटक पाहात राहते. त्याच्याशी गुजगोष्टी करते. त्याने अजून थांबावं म्हणून विनंती करते. पण आता त्याची पावलं पुन्हा त्याच्या घराकडे वळू लागलेली असतात. बराच वेळ खेळल्यानंतर अचानक आईची आठवण येऊन मुलाने घरात पळावं इतक्या घाईत  ते निघून जातं....
पण जाता जाता माझ्या घरात केशरसडा उधळून जाते.......

Apr 4, 2025

गणित आणि मी.

नववी-दहावीचं वर्ष

दहावी बारावीचे रिझल्ट लागले की, ऐंशी टक्के न नव्वद टक्के शिवाय बोलतच नाही कुणी....गेला बाजार सत्तर टक्केच्या खाली सहसा नसतातच कोणी की काय असं वाटावं, असा माहौल दिसतो सगळीकडे. तेव्हा साहजिकच एकदा तरी स्वतःच्या दहावी बारावीचं वर्ष आठवतंच, नाही म्हटलं तरी.

 छोट्याशा तालुक्याच्या गावी आठवी ते दहावी शिक्षण झालं. त्याआधीचं त्याहुनही लहानशा खेड्यात.  त्यामुळे ते तालुक्याचं गावही शहर वाटायचं तेव्हा. न तिथल्या शाळेतली मुलं चकचकीत..!!... असे दिवस होते ते. 

आमच्या खेड्यावर तर पायात पायताणही नसायची कोणा विदयार्थ्याच्या. तालुक्याला पाहिलं, इथं तर प्रत्येकाच्या पायात चप्पल दिसते. मग आधी एक चप्पल विकत घेतली. पण सवय नसल्याने कुठंही काढून ठेवली, की तिथंच विसरायला व्हायची. सुदैवाने तेव्हा चप्पल चोर फारसे बोकाळले नव्हते. 

इंग्रजीचा गंध नाही सातवीपर्यंत. मग आठवीत आमच्यासारखे खेड्यावरून आलेले विद्यार्थी वेगळे बसवले जायचे. त्यांच्याकरिता इंग्रजीचा वेगळा कोर्स असायचा. 

ओ की ठो कळायचं नाही. 

घरी काही अभ्यासाचा, पास व्हायचा तगादा नसायचा. त्यामुळे रमत गमत अभ्यास होईल तेवढा करायचा. परंतु पालक जरी ठेवत नसले, तरी गणित आणि इंग्रजी हे दोन शत्रू सतत धाकात ठेवत. अशावेळी माझ्याचसारखे गरीब बिचारे असलेले, मराठी, इतिहास, हिंदीसारखे विषय मला टेकू देत. आधार देत. पास व्हायला मदत करत. 

मग नववी उजाडली. आणि बीजगणित नावाचा आधुनिक शत्रू डोक्यावर येऊन थयथयाट करू लागला. इथं दोन अधिक दोनची मारामार होती तिथं,  ए वर्ग अधिक बी अधिक सी चा घनं वगैरे घनघोर लढाईच सुरु केली शत्रूने एकदम. दाणादाण उडाली. पळता भुई झाली. 

नववीचा वर्ग जून मध्यावर सुरू झालेला. ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली चाचणी. सगळे गरीब बिचारे विषय आले आणि मुकाट गेले. पण गणिताचा पेपर अशा काही शस्त्रानिशी आला होता, की त्याच्याशी दोन तर जाऊ दे, एक हातही करता आला नव्हता. मला एक बोटही लावू दिलं नाही त्याने आपल्या अंगाला कुठंही. आला तसा कोरा करकरीत गेला. पण मला घायाळ करूनच.

साधारण आठेक दिवसांनी चाचणी परिक्षेचे पेपर तपासून मिळायचे. त्यात सारे हुशार (आगाऊ) विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रोज सरांना, "सर सर ...पेपर नाही आणले का....कधी देणार?"... वगैरे विचारून आमचं टेन्शन अजून वाढवायचे. 'मरो ते पेपर...नाही दिले तर काय आकाश कोसळणार आहे का'....असं वाटत राहायचं. आणि सरही असे वस्ताद असायचे काही काही, की मुकाट ज्याच्या त्याच्या हातात पेपर देण्याऐवजी, त्याच्या मार्कांचा पुकारा करून, बोलवून द्यायचे. बरं आवाजही एकेकाचा असा दणदणीत लेकाचा, की त्याकाळी माईक वगैरे नसूनही अख्ख्या शाळेला ऐकायला जातील मार्क ....

तर असं गणिताचा पेपर कोरा गेल्यावर आठ दिवस उलटले, न आज पेपर मिळणार हे कळले होते. जीवाची नुसती उलघाल सुरू होती...(तेवढी तर नंतर इतक्या वेळा प्रेमात पडतानाही नाही झाली साली कधी..!!)...

त्यातल्या त्यात एकच जमेची आणि आनंदाची गोष्ट अशी होती, की माझ्या जोडीला अजून अशीच एक दुस-या खेड्यावरून आलेली मुलगी होती माझ्यासारखीच. (माझ्यासारखीच म्हणजे... माझ्यासारखीच देखणी,.. :P  माझ्यासारखीच गुजराती, माझ्यासारखीच मामाकडे राहून शिकणारी आणि माझ्यासारखाच गणित कोरा पाठवलेली...!!) हिंदीचा तास संपला. न आता गणिताचा सुरू होणार, त्याआधी आम्ही दोघी हळूच वर्गाबाहेर सटकलो.  आणि शाळेसमोर वाहतुकीचा, पण सुनसान रस्ता होता भरदुपारी, तिथं येऊन एका चिंचेच्या थोरल्या झाडाखाली उभ्या राहिलो. 
जाऊन जाणार कुठे...!! ते काही कॉलेज नव्हतं, कॅम्पस वगैरे भरलेलं. सारा आसमंत चिडीचूप होता. फक्त समोर शाळेतून सरांचे शिकवण्याचे आवाज थोडे येत होते. 

दिवस इतका वाईट होता, काय सांगू...!! भर ऑगष्टचा पहिला आठवडा...कोकणातला पावसाळा... अचानक धो धो पाऊस जो सुरू झाला...!! माझ्या जोडीदारणीने वर्गातून निघताना नशीब छत्री घेतली होती हातात. एका छत्रीत आम्ही दोघी त्या झाडाखाली पंचेचाळीस मिनिटे पाऊस झेलत उभ्या राहीलो. 
ती पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस युगासारखी घालवली आम्ही. 

आणि शाळेच्या तासाचा टोल वाजला. हुश्श..
लांबून कानोसा घेतला. सर वर्गाबाहेर पडल्याचा. न चुपके से वर्गात शिरलो. साळसूदासारख्या. तर काय...!!...
बेंचेस बडवून की हो सा-या वर्गाने आमचं स्वागत केलं..!!. आम्ही मुकाट माना खाली घालून आपापल्या जागी जाऊन बसलो. कारण आम्ही समजून गेलो त्या स्वागतावरूनच, की जरी आम्ही वर्गात नव्हतो, तरी आमचे भोपळे सरांनी भर वर्गात फोडले होते. 

का असं करत असतील सर ? :P  ...

( का असं करतात ते आज कळतंय म्हणा...वर्गात शिकवताना... :P ...)
मागच्या वर्षीच एक माझा विद्यार्थी, कॉलेज सुरू झाल्यावर माझ्या जवळ आला. आणि मला म्हणाला, "मॅडम मी नापास होऊन पुन्हा या वर्गात आहे, हे बोलू नका प्लीज कोणासमोर वर्गात"..... 
घ्या... इथं तर माझ्या लक्षातही नव्हतं, की हा विद्यार्थी गेल्या वर्षीचाच आहे. कारण तो सठीसमासी कधीतरी उगवायचा न मावळायचा.  मी त्याला विचारलं, "तू गेल्या वर्षी माझ्या वर्गात होतास"..???....तसा तो एकदम कूल झाला..! 
"नाही लक्षात का मॅम..??.जाऊ द्या ..मग राहू द्या". म्हणत तो एकदम सुटकेचा श्वास सोडून निघून गेला...!!)

तर असं नववीचा पावसाळा हा असा बरसून गेला...डोक्यावरून, डोळ्यातून आणि गणिताच्या पेपरावरून...त्यामुळे तो कायमचा लक्षात राहीला. 

आणि असे हे गणित, इंग्रजी वगैरे घातकी शत्रू त्या त्या वेळी घात करून गेले. तरी आम्ही झाशीच्या राणीसारख्या लढलोच. आज मी महाविद्यालयात एक पेपर का होईना शिकवतेय.. त्या शत्रूंच्या नाकावर टिच्चून. आणि ती माझी देखणी (माझ्याहून जरा जास्तच) जोडीदार, बारावीलाच ह्या शत्रूंसमोर नांगी टाकून गावातल्या धनाढ्य आणि तालेवार माणसाची सून होऊन चांगली गाडीतून फिरू लागली..... तेही या शत्रूंच्या नाकावर टिच्चूनच............!!!

 

(दहावीच्या आणि बारावीच्या वर्षांची कहाणी पुन्हा केव्हातरी.........)

Dec 24, 2022

वय आणि त्याची गणितं

 अमुक वयात अमूक करावं आणि तमुक वयात तमूक 

याची गणितं आपणच मांडलेली असतात. बराच सामाजिक प्रभावही असतो त्यावर. या वयाची, वाढत्या वयाची दडपणं घेऊनच जगत असतो मग आपण. विशेषतः समाजात वावरताना आपण याबद्दल अनेकदा टारगेटही केले जातो. 
शिक्षणाचं वय, लग्नाचं वय, मुलंबाळं होण्याचं वय, काम करण्याचं वय, विशिष्ट कामं करण्याचं वय, विशिष्ट छंद किंवा आवडी जोपासण्याचं वय, विशिष्ट कपडे घालण्याचं वय, फॅशन करण्याचं वय..........

प्रत्येक गोष्टीसाठी वयाच्या अलिखित मर्यादा आपण आखून घेऊन जगत असतो. त्या त्या मर्यादेत त्या त्या गोष्टी नाही झाल्या तर समाज आपल्याला दडपणं देत राहतो, आणि आपणही ते दडपण घेत राहतो. बरं या मर्यादा कालसापेक्ष बदलत असतात, तरी आपण ते दडपण घेतोच. आता लग्नाचंच बघा ना, एकेकाळी मुलामुलींची लग्नं दहा ते बारा वयात न झाली, तर दडपण घेणारे पालक होतेच की.. आणि आता विशीत लग्नं झाली, तर एवढ्या लवकर? असं विचारलं जातं. पण तिशीनंतरही लग्नं नाही झालं तर पुन्हा जो तो हैराण करतो विचारून, काय मग लग्नं कधी करताय...? झालं, पालक आण मुलं दोघेही चिंतेत पडायला सुरूवात..

या वयाच्या मर्यादा आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसलेल्या असतात की आपणही त्या मर्यादेतच विचार करतो आणि त्याप्रमाणे  काय करायचं नि काय नाही करायचं याची गणितं मांडत राहतो. 
आता या वयात? लोक काय म्हणतील? याचा बागुलबुवा लोक काही म्हणण्याआधीच आपल्या मनाला खात राहतो.
मागच्याच महिन्यात मित्राने घेतलेल्या त्याच्या नवीन गाडीत बसले होते. त्याला वरती काचेचं ओपन होणारं रुफ टॉप होतं. त्याने मला ते उघडून दिलं आणि त्यातून डोकं काढून उभं राहायला सांगितलं. मी पण मजेत वर डोकं काढून वाऱ्याचा आनंद घेत उभी राहिले, नंतर दोनच मिनिटात मला वाटू लागलं, हे तर लहान मुलांसाठी असतं ना...आपण या वयात काय हे असल्या गमती करतोय...

त्यावर मित्र म्हणाला, की हेच चुकतं आपलं, आनंद घेण्यासाठी वयाच्या मर्यादा असतात का? जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत सगळ्याच गोष्टी करण्यासाठी मर्यादा का आखून घ्यायच्या? केवळ समाज काय म्हणेल या भीतीने?

तर वयाची गणितं आपल्या मनात असतात. त्यामुळे आपणच ठरवून टाकतो की अमुक वयानंतर हे होणार, शरीर थकणार, अमूक आजार होणार, मृत्यु येणार वगैरे...आपलं शरीर हे एखाद्या कम्प्युटरसारखे असते. तुम्ही जी कमांड देणार ते ते अंमलात आणत असते. तुम्ही मनाला आदेश दिलात की अमुक वयात तमुक होणार. तर ते होणारच ना... 

मी तर म्हणते की मरणाचे वय देखील आपणच ठरवत असतो. आपल्या मनाने. आता काय करायचंय जगून? असं तुम्ही स्वतःच म्हणालात तर ते जगणं लवकरच संपणार. तसं तर इतके दिवस देखील जगून काय केलं आपण? नसतो जगलो तर काय जग थांबणार होतं? मग आता तरी का म्हणायचं ते...

त्यामुळे लोक काही म्हणू दे... म्हातारचळ लागलाय म्हणू दे.. अर्धी लाकडं गेली म्हणू दे.. आता शोभतंय का म्हणू दे... काहीही बरळू दे...
डोक्यातली वयाची गणितं दूर फेकून मस्त जगा.. मस्त खा.. प्या.. प्रेम करा.. उड्या मारा.. खिदळा.. फॅशनी करा..छंद करा.. नवीन गोष्टी शिका. काय वाट्टेल ते करा..ज्यांना आपल्या या वागण्याचा त्रास होतो त्यांनी दूर राहावं आपल्यापासून.

समाज वयाचीच कशाला सगळीच गणितं आखून देतो आणि आपल्याला त्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न करतो. आताच पठाण सिनेमा आलाय. त्यात किती त्या टिप्पण्या शाहरुखवर आणि दिपिकावर... खरंतर हेच स्टार अभिनेते लोक चौकटी मोडण्याचे काम करत असतात. तो आता म्हाताराच दिसतोय, दिपिका सपाट दिसतेय. सेक्सी दिसत नाही. काय नि काय.. नका बघू ना. तुम्हा ट्रेलर दिसला. सिनेमा नका बघूु. कोण जबरदस्ती करतोय का...अमुक फिगर म्हणजे सेक्सी, तमुक त्वचा म्हणजे तारुण्य, अमुक रंग म्हणजे सौंदर्य,  हे सगळं चौकटीत का बसवू पाहता तुम्ही..?  कुणाला डबल एक्सेल् फिगर सेक्सी वाटेल, तर कुणाला झिरो फिगर. कुणाला विशीतला जोडीदार आकर्षून घेईल, तर कुणाला प्रौढ. ज्याचं त्याला ठरवू द्या ना रे कसं जगायचं ते......तुमचं तुम्ही बघा. 

तसं तर विशी-तिशीतच म्हातारी झालेली मनं दिसतात आजुबाजूला.. नि नव्वदी उलटूनही रसरसून जगणारी माणसेही दिसतात... !

Jul 8, 2022

रिमझिम गिरे सावन....

रिमझिम गीरे सावन ...

दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि  नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!

Jul 6, 2022

संपन्न वारसा

हरप्पन संस्कृती मधील मोएनजो दरो आणि हरप्पा ही दोन गावे तर पाकिस्तानात गेली. ती बघायची खूप इच्छा असूनही ते शक्य नाही. पण याच संस्कृतीतील लोथल हे गाव अहमदाबाद जवळ असल्याने ते बघायचे कधीपासून मनात होते. ते आज पाहिले... 
साडेतीन हजार वर्षापूर्वी मातीत गडप झालेली ही गावे... त्यांचे बाथरूम, चुली, गोडाऊन, डॉकयार्ड, कारखाने... सगळ्यांच्या विटांच्या रांगा फक्त शिल्लक आहेत. गाईड म्हणाला की या भिंती दहा बारा फूट खोल होत्या. नंतर त्या मातीने भरून घेतल्या परत. तो proper गाईड नव्हता. तिथे काम करणारा माणूस होता. पण तो म्हणाला की आधीच्या पूर्ण भिंतींचे फोटो काढून म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तो कितपत खर खोटं सांगत होता माहीत नाही. लोथल हे मुएंजो दरो आणि धोळा विरा प्रमाणे अजून युनेस्कोने जपायला घेतलेले नाही. त्यामुळे तिथे अनास्था दिसते. 
 म्युझियम दुरुस्ती साठी बंद असल्याने बघता आले नाही.
त्यात तिथे सापडलेल्या टेराकोटा, शंख शिंपले आदिपासून बनवलेल्या मण्यांच्या माळा, भांडी, खेळणी वगैरे ठेवलेली आहेत.
याशिवाय तांबे आणि ब्राँझच्या वस्तू... टेरकोटाच्या भांड्यांवर पेंटिंग आहे.
काल पाच - सात मजली विहिरी पाहिल्या. परवा मोढेराचे सूर्यमंदिर पाहिले. भारतात अशा प्राचीन वास्तू, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. 
प्रत्येक शिल्प कथेत सगळीकडे स्त्रिया, पुरुष, मुले सोबत बरोबरीने वावरताना दिसतात. कुठेही स्त्रिया घुंघट मध्ये दिसत नाहीत. 
शिल्पातील एकेका स्त्रीच्या अंगावरील आभूषणे, त्यांच्या केशभूषा बघता थक्क व्हायला होते. व्यवस्थित शेप दिलेल्या दाढीवाल्या पुरुषांची शिल्पे, स्त्रियांच्या हातात पर्स, आरसा, पुस्तक, लेखणी इत्यादी वस्तू.. कोरलेली वाक्ये, लिपी, भाषा ...हे सर्व पाहता भारतात दीड दोन काय, त्याहून कितीतरी अधिक वर्षे आधीपासून संपन्न, आधुनिक अशी नगरे होती, कारखाने होते, निर्मिती होती. ज्ञान होते. याचे ढळढळीत सूर्यप्रकाशा इतके लख्ख पुरावे ठायी ठायी आढळतात.
तरीही जेव्हा भारतात मोगल आणि इंग्रज येई पर्यंत काहीच, अगदी सुई देखील बनत नव्हती असे म्हणणारे, आणि बनत होते असे म्हणणाऱ्या लोकांना मंद, अंध भक्त इत्यादी म्हणणारे अतीशहाणे लोक किती खोटारडेपणा करतात ते कळतं...
अनेक प्राचीन मंदिरे भूगोल आणि खगोलशास्त्राच्या परफेक्ट ज्ञानावर अशा रीतीने स्थापित आहेत की सूर्यकिरणे ठराविक वेळी बरोबर गाभाऱ्यातील मूर्तीच्या पायावर येतात.
Harappan कालीन नगरात शास्त्रशुद्ध भुयारी गटार व्यवस्था होती. होड्या होत्या, जहाजे होती, व्यापार होता, कला होत्या, क्रीडा होत्या....
आपण अशा एका संपन्न वारशाचे वंशज आहोत. याचा आनंद वाटतो.

May 6, 2022

सरस्वती

 




"ज्या देशात विद्येची देवता सरस्वती आहे, त्याच देशात स्त्रियांना शेकडो वर्षे शिक्षणांपासून वंचित ठेवले गेले."
असे वाक्य मी नेहमी म्हणत असते.
मात्र प्राचीन मंदिरे आणि लेण्या पाहत असताना, त्यात अनेक स्त्रिया एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन लिहितानाच्या मूर्त्या आहेत. अनेक स्त्रिया नृत्य करताना, वाद्ये वाजवताना दिसतात. मुक्त शृंगार करताना दिसतात. अगदी सर्वसामान्य स्त्री आपल्या कडेवर मुल घेऊन रस्त्यावरची मिरवणूक बघते अशा मूर्त्या दिसतात. त्यात तिच्या डोक्यावर पदर नसतो, खालचे वस्त्र फक्त जेमतेम गुडघ्यापर्यंत, आताच्या बर्म्युडासदृश्य असते. अनेक मूर्त्यांच्या उरोभागावर वस्त्र नसते. 
प्राचीन मंदिरे, लेणी यातील कुठल्याही मूर्तीच्या चेहऱ्यावर बुरखा, घुंघट, पदर, स्कार्फ सारखे कोणतेही वस्त्र मी अजून तरी पाहिले नाही. 
हम्पीसारख्या ठिकाणी खुद्द राजाची पत्नी सणावारी सार्वजनिक ठिकाणी शास्त्रीय नृत्य करत होती याची माहिती गाईड देतो. मग असे नृत्य गरत्या बाईने करू नये, असे केव्हापासून समाजाच्या मनावर बिंबले असेल?
पुराणकथात कुठेही स्त्रिया घरी बसल्यात आणि फक्त पुरुष  ऍक्टीव्ह आहेत असे दिसत नाही. पांडवांबरोबर द्रौपदी फिरतेय, रामाबरोबर सीता फिरतेय. अशा जोड्याजोड्याच दिसतात. त्या कृष्णाशी चर्चा करतायत, युद्धावर बोलतायत, वेदना व्यक्त करतायत. जाब विचारतायत. 
असे जर असेल, तर नेमकं कुठल्या काळापासून भारतातील स्त्रिया घुंघट, पदर, बुरखा, पडदा घेऊ लागल्या असतील, अशिक्षित राहू लागल्या असतील, असा प्रश्न पडतो. हे अंधारयुग नेमकं कधी आणि का सुरू झालं असेल, यावर अभ्यासपुर्वक मांडणी केली जायला हवी.
मग सरस्वतीला उगा दोष देण्यात काय अर्थ?  समाज बाह्य परिस्थीतीने बदलतो, हतबल होतो, असहाय होतो असेही घडू शकते ना? 

Nov 17, 2021

अविकास आणि हिंसा

 सामाजिक राजकिय विकास आणि त्या त्या ठिकाणचा समाज, माणसे यांची प्रगती यांचा थेट संबंध असतो का असा प्रश्न पडतो.

विकास नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत म्हणून त्या त्या ठिकाणचे किंवा अमुक तमूक समाजाचे लोक हिंसेकडे वळतात यातही कितपत तथ्य आहे?
हिंसा ही प्रवृत्ती असते. ती वैयक्तिक असते, तशीच सामाजिकही असते. तिचा विकास, गरिबी, श्रीमंती याच्याशी फारसा संबंध नसावा. अपवाद वगळता.
विकास नाही म्हणून हिंसा, नक्सलवाद, विकास नाही म्हणून शेतकरी किंवा इतर आत्महत्या, विकास नाही म्हणून आंदोलन, मोर्चे, तोडफोड इत्यादी इत्यादी....
याचा थेट संबंध जोडणं शक्य नाही.
विकास नाही, म्हणून आर्थिक दरिद्री समजल्या जाणाऱ्या कोकणात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या ऐकीवात आली नाही अन्यथा.
राजस्थान, गुजरात ही एकेकाळची अविकसित राज्ये. राजस्थान तर उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी प्रदेश, शालेय शिक्षणाची वानवा. पण दोन्ही राज्यांतील मोठ्या समाजाने देशच नव्हे तर जग पादाक्रांत करत आर्थिक आघाडी मिळवलेली दिसते.
घरदार नि सारा संसार सोडून देशोधडीला लागलेला सिधी समाज मोर्चे, बंद, हरताळ, आरक्षण इत्यादी चळवळी न करता गेला तिथे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडला आणि श्रीमंत समाजाच्या यादीत जाऊन बसला.
विकास नसलेल्या यूपी, बिहार सारख्या राज्यांतून अनेक कष्टकरी लोक बाहेर पडून मेहनतीची रोजी रोटी खाऊ लागले. तशीच देशोधडीला लागलेली कश्मीरी पंडीतांची मुलं भारतात लांबलांबच्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या सीटा मिळवून उच्चशिक्षण घेऊ लागली. कुठेही बदला वृत्ती पाळून हाणामाऱ्या करत बसलेली ऐकिवात नाहीत.
विकास नाही म्हणून हुशार, होतकरू मुलं आक्रस्ताळेपणा न करता देशाबाहेर पडली, आणि परदेशातल्या आर्थिक प्रवाहात जम बसवून राहिली.
विकास दाराशी येत नसेल, तर विकासापर्यंत पोचावं लागतं. स्वतःच विकासाचा स्रोत होऊन वाहावं लागतं. हे अनेक समाजांनी, व्यक्तींनी, प्रांतांनी, परिसरांनी सिद्ध केलेय.
विकास नाही म्हणून मी हिंसा करतो, आत्महत्या करतो, गोंधळ घालतो ही पळवाट आहे, आपल्या परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडून सुटका मिळवणं आहे.
जीने की तमन्ना हो तो पत्थर फाड के भी पौधे निकलते है और फूल खिलाते है....
हिंसा ही वृत्ती आहे. राजकीय, सामाजिक नेत्यांचा स्वार्थ आहे.
तिचा विकासाशी फारसा संबंध नाही.

Nov 13, 2021

सात सुखांच्या खाली -

    


सात सुखांच्या खाली
दुःखाचा काटा सलतो
भरलेल्या पेल्यावरचा
उरलेला का डुचमळतो..


एकदा एका गोष्टीत तोतया राजकुमारी कोणती आणि खरी कोणती हे ओळखायचं असतं. तेव्हा राजाचा हुशार प्रधान ती जबाबदारी घेतो आणि रात्री त्या दोघींची एकसारख्या बेडरूममध्ये झोपायची सोय करतो. सारखेच शाही पलंग, एकावर एक अशा सात मऊ, रेशमी गाद्या, त्यावर रेशमी चादर, उशी, इत्यादी सारीच सारखी व्यवस्था.

दुसऱ्या दिवशी दोघींना सकाळी तो विचारतो, "झोप लागली ना व्यवस्थित?' तेव्हा त्यातील एकजण म्हणते, 'हो मस्त झोप लागली.' तर दुसरी म्हणते 'नाही, रात्रभर मला गादीखाली काहीतरी टोचत होतं.'
तेव्हा प्रधान सांगतो, 'हीच खरी राजकुमारी. जी शांत झोपली रात्री ती तोतया आहे.'
बात अशी असते, की प्रधानाने रात्री दोघींच्या त्या रेशमी सात मऊ गाद्यांच्या खाली काही वटाण्याचे दाणे टाकून ठेवलेले असतात. खरी राजकुमारी, जिला कोणत्याच अशा गैरसोयींची सवय नसते, सुखासीन आयुष्याचीच सवय असते, तिला ते रात्रभर टोचत राहतात. ती निवांत झोपू शकत नाही. पण जी सामान्य मुलगी तोतया राजकुमारी बनून आली असते तिला मात्र ते ऐश्वर्य सुखाची झोप घेण्यास पुरेसं असतं.
तर आता प्रश्न असा आहे, की त्या राजकुमारीचं दुःख हे खोटं आहे का? तिचा तो माज आहे का?
अनेकदा आपण आपली भावनिक, मानसिक दुःखं, आपल्या समस्या, आपल्या गैरसोयी, अडचणी कुणाला सांगायला जावं, तर त्यांच्याकडून उपदेश येतो, की ज्या लोकांना एवढंही मिळत नाही त्यांच्याकडे पाहा. लोकांना दोन वेळ जेवायला मिळत नाही, रहायला छप्पर नाही, अंगावर कपडा नाही. त्यांची खरी दुःखं! तुम्हाला सुखासुखी सगळं मिळत असताना तुमच्या या समस्या म्हणजे चोचलेच आहेत रिकामपणाचे.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रत्येक माणसाला मिळायलाच हव्यात हेही तितकंच खरं. या मूलभूत गोष्टीही मिळत नसणारे दुर्दैवी जीव खरेच. अभागीच ते.
पण म्हणून या गोष्टी नीट मिळत असणाऱ्यांची भावनिक, मानसिक दुःखे खोटी कशी ? किंवा गैरसोयीच्या समस्या, खोट्या कशा?. मुलभूत गोष्टी मिळणे ही तर प्रत्येक प्राणीमात्राची गरज. वाघाला देखील शिकार केली की झोपायला गुहा लागतेच. ती मिळायला हवी.
पण या मुलभूत गरजांच्या नंतरच तर खऱ्या अर्थाने मानवी गरजा निर्माण होतात ना. मग सात गाद्यांच्या खालचा वाटाणाही टोचतोच. किंबहुना तो टोचतो तेव्हाच ती व्यक्ती जगण्याच्या प्राणीस्तरावरून जगण्याच्या माणूस स्तरावर पोचलेली असते. वाटाणा न टोचणारी मुलगी अभावातून आलेली आहे. दुर्दैवी आहे. पण म्हणून वाटाणा टोचणारीचं दुःखं हे दुःखच नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे कसं म्हणायचं? तिने आपली रात्रीची झोप गमावली आहे हे सत्य उरतंच.

० 

Sep 8, 2021

कोकण आणि वेड -

 कोकणात बैल आहेत

पण पोळा नाही ..संपला विषय ( हायला इथे माणसाला खायला पुरणपोळी नाही. गहू नाही. बैलाला कुठून घालायची ?)
दिवाळी झाली की घाटावरून नंदी बैल घेऊन लोक कोकणात उतरायचे.
आमच्या ऑफिस मधला एक सहकारी ऑफिसमधल्या एका घाटी कलिगला फार चिडवत असे. "दिवाळी संपली. आता तुमचा घाट उतरेल खाली गुबु गुबू करत."
तो काळ भावना दुखावून घेणारा पोचट काळ नव्हता. आणि कोकणात तर जाता येता भावनेच्या पाठीत धपाटे घालणारे अंतू बरवा गावोगावी असल्याने लोकांच्या भावना घट्ट बनलेल्या असत. आपल्यावरचे विनोद देखील ते हसून साजरे करत.
एक राष्ट्रीय कीर्तनकार (पक्षी: संघी) येत.
ते म्हणायचे कोकणात भिकारी नाही. (दारिद्र्य असून) कोकणात महारोगी नाहीत. मात्र कोकणात वेडे फार. ( आणि वेड्या पण) प्रत्येक गावात सापडतील.
हे खरं होतं. पंचक्रोशीत प्रत्येक गावात एक दोन तरी दिसत. (आरशात दिसत का हे विचारू नका)
नंतर बरेच वर्षांनी जयवंत दळवी यांच्या लेखनात हे वाचले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत वेडी पात्रे असतात.
असो
आम्ही आपले समाधान मानून घ्यायचो की वेड असणं केव्हाही चांगलं...
कारण या जगात वेड्या माणसांनीच परिवर्तन घडवलंय...
माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा...हे गाणं लिहिणारे वामनराव जोशी कोकणीच असणार ??

पण चांगला कवी लेखक कालातीत कसा लिहितो ते हे गाणं वाचून तुम्हाला कळेल.. शंभर वर्षापू्र्विचे हे गाणे आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत जुळते बघा..

जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा !!

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ।

*कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या, नशेने धुंदली भारी ।*

अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी

- अलका 

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...