Sep 27, 2021

भटकंती.. कोकण.

Once again in kokan ..
कोकण अजूनही happening आहे.. निळेशार, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे, त्यावर दूरवर तरंगणाऱ्या होड्या, लोभस, रंगांची उधळण करत होणारे सूर्यास्त, हिरवागार आसमंत, झाडांनी गच्च भरलेले डोंगर- टेकड्या, पावला पावलावर दुथडी खळाळत वाहणाऱ्या नद्या, त्यावरील पुल, ठायी ठायी कोसळणारे धबधबे, वाऱ्यावर डोलणारे माड, मनाला सुकून देणारी ग्राम मंदिरे, त्यांची ऐसपैस प्रांगणे, त्यातील नजाकतीपूर्ण दीपमाळा, देवळासमोर मस्ट असलेले तळे, आणि या सर्वांवर कळस चढवणार निळेभोर विस्तीर्ण आकाश... एकूणच वातावरणात भरलेला निवांतपणा.. आणि एकदम सुरक्षित वातावरण.
सारं अजून तरी जसच्या तसं आहे.
एकेका ठिकाणावरून पाय हलत नाही. निघावस वाटत नाही.
कोकणात तुम्ही एकटे फिरू शकता अजून. स्त्री असूनही. अगदी खेडोपाडी देखिल, आणि आधुनिक कपड्यात देखील. कोकण सुरक्षित आहे. स्त्रियांकडे पाहण्याची नजर बहुतांश निर्मळ आहे. निकोप आहे.
आत्ता रत्नागिरी परिसरात आहे. 
कर्णेश्वर हून येताना मस्त पाऊस आणि चिंब भिजणारा हिरवा आसमंत अनुभवला. कोकणातला पाउस हा एका मोठ्या निबंधाचा विषय होऊ शकतो.
बाकी उघडीप आहे. भटकायला योग्य असा मोसम आहे.

कोकण ही एक धुंद करणारी नशा आहे.

जुन्या कवितेच्या दोनच ओळी आठवतायत. पूर्ण कविता खूपदा शोधूनही सापडलेली नाही.
"कोकण दरिद्री बोलते कोण?
छे, छे, ती तर सुंदर सोन्याची खाण.."

Sep 8, 2021

कोकण आणि वेड -

 कोकणात बैल आहेत

पण पोळा नाही ..संपला विषय ( हायला इथे माणसाला खायला पुरणपोळी नाही. गहू नाही. बैलाला कुठून घालायची ?)
दिवाळी झाली की घाटावरून नंदी बैल घेऊन लोक कोकणात उतरायचे.
आमच्या ऑफिस मधला एक सहकारी ऑफिसमधल्या एका घाटी कलिगला फार चिडवत असे. "दिवाळी संपली. आता तुमचा घाट उतरेल खाली गुबु गुबू करत."
तो काळ भावना दुखावून घेणारा पोचट काळ नव्हता. आणि कोकणात तर जाता येता भावनेच्या पाठीत धपाटे घालणारे अंतू बरवा गावोगावी असल्याने लोकांच्या भावना घट्ट बनलेल्या असत. आपल्यावरचे विनोद देखील ते हसून साजरे करत.
एक राष्ट्रीय कीर्तनकार (पक्षी: संघी) येत.
ते म्हणायचे कोकणात भिकारी नाही. (दारिद्र्य असून) कोकणात महारोगी नाहीत. मात्र कोकणात वेडे फार. ( आणि वेड्या पण) प्रत्येक गावात सापडतील.
हे खरं होतं. पंचक्रोशीत प्रत्येक गावात एक दोन तरी दिसत. (आरशात दिसत का हे विचारू नका)
नंतर बरेच वर्षांनी जयवंत दळवी यांच्या लेखनात हे वाचले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत वेडी पात्रे असतात.
असो
आम्ही आपले समाधान मानून घ्यायचो की वेड असणं केव्हाही चांगलं...
कारण या जगात वेड्या माणसांनीच परिवर्तन घडवलंय...
माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा...हे गाणं लिहिणारे वामनराव जोशी कोकणीच असणार ??

पण चांगला कवी लेखक कालातीत कसा लिहितो ते हे गाणं वाचून तुम्हाला कळेल.. शंभर वर्षापू्र्विचे हे गाणे आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत जुळते बघा..

जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा !!

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ।

*कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या, नशेने धुंदली भारी ।*

अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी

- अलका 

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...