संक्रांत आणि अश्विन नवरात्र हे दोन उत्सव भारताच्या बहुतांश सर्व राज्यात साजरे होताना दिसतात.
भारतीय बहुतांश सण उत्सव हे ऋतुचक्र आणि त्यातील बदल यांना अनुसरून असतात, हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे.
जरी हे सगळे आता अधिकतर हिंदू धर्माला जोडले जात असले, आणि एके काळी त्यांच्यावर सवर्णांनी कब्जा केलेला असला तरी खरं तर हे सगळ्यांच्याच जीवनाशी जोडले गेलेले आहेत, किंवा असायला हवेत. ऋतुमानानुसार आहार, विहार, पोशाख इत्यादी साऱ्याच गोष्टीमध्ये बदल करत आयुष्य सुखकर आणि आनंदी करून घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्याचा थेट संबंध धर्माशी ना जोडता, म्हणूनच सर्व धर्मीय भारतीय यांनी त्यात सहभागी व्हायला हवे.
तिळगुळाचे संबंध धर्म आणि जातीशी नसून थंड हवामानात उष्ण आणि स्निग्ध पदार्थ सेवन करण्या शी आहे.
नवरात्रीत हिरवा रंग हा धर्माशी संबंधित नसून धर्तीवर पावसानंतर उगवून आलेल्या संपन्न हिरवाईशी आहे.
दिवाळीत रोषणाईचा संबंध धर्माशी नसून अश्विनातल्या काळोखाशी आहे..
त्यामुळे धर्म आणि पूजा प्रतीके यांना बाजूला ठेऊन सर्व भारतीयांनी आपले भारतीय सण मस्त साजरे करावेत. हे सुंदर सण कुणा एका धर्म किंवा जातीची मक्तेदारी नाही.
- अलका गांधी - असेरकर
No comments:
Post a Comment