Jul 4, 2020

आजची फेसबूक पोस्ट - (४-७-२०२०)

मंदिरं, देव इत्यादी ब्राह्मणांचे वर्चस्व आहे म्हटले तर गणेशोत्सव, नवरात्री आदी मंडळात ब्राम्हणी मंडळं फारशी दिसत नाहीत.
जर टिळक नावाच्या ब्राम्हणाने सार्वजनिक गणपतीचं स्तोम माजवलं तर त्यात ब्राम्हण अधिक का दिसत नाहीत?
अनेक सो कॉल्ड 'राजे' मंडळांचे पदाधिकारी हे बहुजन समाजातील आहेत आणि त्यांची तेथील दादागिरी, वर्चस्व बहुश्रुत आहे. अगदी भक्तांना ढकलून देणे, रपटे देणे, स्त्रियांचीही मानगूट धरून त्यांना बाजूला करणे इत्यादी प्रकार तिथे घडतात. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मागे दारू, पत्ते, जुगार यांचे अड्डे असतात. मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणे असतात. यात किती ब्राम्हण असतात? आणि अशा मंडळांवर कितीशी टिका होते?
शिवाय इथे इतके देव, धर्म आणि पंथ आहेत की त्या सगळ्या ठिकाणी ब्राम्हण नसतात. जंगम, गुरव, भंडारी, गोसावी आणि तत्सम अनेक लोकांच्या हातातही बरीच ठिकाणं असतात. त्यामुळे एकूणच देव, धर्मावर ब्राम्हणी सत्ता आहे म्हणणं चूकीचं आहे.
हीच गोष्ट विविध शैक्षणिक, सहकारी इत्यादी संस्थांची आहे.
अशा बहुतेक सामाजिक संस्था बहुजनसमाजाच्या हातात आहेत आणि तिथं तिथं त्यांचं जातवर्चस्व काम करतंय. मी स्वतः याचे बरेच अनुभव घेतलेले आहेत. ब्राम्हणी संस्था अशा फार कमी दिसतात. आणि ज्या काही थोड्याफार आहेत त्यांच्यात प्रमाणात उदारभाव अधिक दिसलेला आहे.
तरी देखील राग, फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी सगळ्यांना ब्राम्हणच लागतो. नाहीतर शिताफीने ब्राम्हण्यवाद वगैरे नावं ठेवायची.
अगदी सुरुवातीपासून पाहाता राजकीय सत्ता ही क्षत्रियांच्या हातात राहिलीय. आणि त्यांच्याच घरात स्त्रियांचे स्थान अधिक दुय्यम दिसत आलेय. सीता, द्रौपदी ही उदाहरणं क्षत्रियांच्या घरातली आहेत, न की ब्राम्हणांच्या. ब्राम्हण असलेल्या रावणाच्या घरात मात्र स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होतं. आणि देव म्हणून प्रामुख्याने पुजले गेलेले राम कृष्ण शंकर ईत्यादीही क्षत्रिय आहेत.
वटपौर्णिमा, वैभवलक्ष्मी, संतोषीमाता, गुरुवार, मंगळवार, सत्यनारायण नि असली सगळी व्रतं करण्यात बहुजन स्त्रिया अधिक आघाडीवर आहेत. ब्राम्हण स्त्रियांपेक्षा.
आरएसएस ब्राम्हणी पक्ष म्हटला जातो, पण त्यात बहुतांश सगळ्याच समाजातील लोक दिसतात. खुद्द पंतप्रधान हे ओबीसी आहेत. अडवाणी पण बहुधा ब्राम्हण नाहीत.
जातीयवादात प्रत्येक समाज भरडला गेलाय इथं. शीखांचे हत्याकांड झालेय. तसेच ब्राम्हणांचेही झालेय. मुसलमानांचे झालेय नि हिंदूंचेही झालेय. जैनांचे झालेय नि बौद्धांचेही झालेय. तरीही सर्वसमावेशक न बोलता सगळे आपापली कार्डं खेळून राजकारण करण्यात पुढे असतात.
अर्थात माझ्या दृष्टीने यात ही सगळी पुरुषांची राजकारणं आहेत. त्यामुळे मी कुणाही एका समाजाच्या बाजूची नाही. हे समाज, ह्या जाती, हे धर्म, पंथ सगळी पुरुषांची सत्तास्थानं आहेत. आणि पुरुष पूर्वीपासूनच एकमेकांची डोकी फोडत आलेले आहेत, एकमेकांच्या बायका पळवत आले आहेत. युद्ध, दंगली, मारामाऱ्या, बलात्कार, स्त्रियांवर वर्चस्व गाजवणे, त्यांच्या शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे, हे खास पुरुषी प्रांत आहेत. त्यामुळे कुणीही नावाजण्यासारखे नाहीच. फारतर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तिथं डोकं फोडून घ्यायचं इतकंच.
अलका गांधी-असेरकर
Madhuri Ingle, Swati Bedekar and १४ others
३ Comments
1 Share

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...